घारापुरी लेणीची सफर..

जवळपास २ महिने झाले माझ्या शेवटच्या (नाशिक) ट्रेकला, त्यामुळे खास रविवारची सुट्टी घेऊन पुढच्या ट्रेकला जायचं ठरवलेले होते मी...मग काय..उजाडला कि तो दिवस. सकाळी जरा लवकरच उठलो...झोपलोच कुठे होतो म्हणा..:/ असो.....
कोण कोण येणार ते सुद्द्धा माहित नव्हते...७ वाजता कुणालचा फोन आला, म्हणतो निघालास का म्हटले “हो, आपण कुठे आहात..??”
दिव्या आणि कुणाल bus stand वर आलेले होते...तिथून गेलो स्टेशनला, पाहतो तर काय श्री.पोत्याभाय आमच्या आधी हजर...!!:) बाकी आपले नेहमीचेच मेम्बर..तेजल,अर्चना. अर्चनाबाई तर हातात पिशवी घेऊन आल्या होत्या..!! (तन्मयची आठवण आली....)बाकीचे काही मुंबई वरून येणार आहेत असे कळले...
बसलो ट्रेन मध्ये..७.०८ ची म्हणता म्हणता ७.२०ची लोकल पकडली..व्हायचंच..cst पर्यंत पोहचेपर्यंत नुसता धुमाकूळ ६ जणांचा...आणि नेहमीचे ठरलेले टारगेट पोत्याभाय:) तरी वाचला तो, वर्तमानपत्र मिळाले नाही वाचायला...परंतु ‘खजुराहो’ ची माहिती मात्र पुरेपूर ऐकली आम्ही त्या निर्माणकर्त्याकडून:)
८.३०ला cstला पोहचल्यावर मोहिझ, धनराज, श्रद्धा आणि दिव्या यांचीही भर पडली....रविवारचा
दिवस....एक हॉटेल उघडे नाही मुंबईत..!! कसे बसे मिळाले एक ठिकाण बराच वेळ चालल्यावर..तिथे डॉक्टर मोनिका, आमच्या अखेरच्या कॅन्डीडेटही आल्या...(खूप खुश असतात हल्ली त्या :p)
चहा-नाष्टा आटपून “गेटवे ऑफ इंडिया” कडे कूच केले...
मग सुरु झाला बोटीतला प्रवास शांत समुद्र, त्यावरील सौम्य लाटा, आणि त्यावरून आवाज करत चालणारी बोट...त्या अथांग सागरातून जाताना कल्पना येते कि या सगळ्या पसाऱ्यात आपले अस्तित्व नगण्य आहे...!! १ ते सव्वा तासाच्या त्या आनंददायी प्रवासात वाटेत दिसणाऱ्या प्रचंड जहाज, पाण्यावर तरंगणारे आणि समुद्रावरून विहार करणारे नयनरम्य पक्षी...यांना आपापल्या कॅमेरात बंदिस्त करून पोहोचलो ‘एलिफंटा’ वर..
पहिला मोर्चा वळवला तो किल्ला पाहायला..’तोफा’..!! खरोखर अप्रतिम आहेत त्या २ अजस्र तोफा..त्यांचे मेकानिझम तर क्लासिकच आहे..पूर्ण ३६० अंशात फिरून फार लांब वरच्या शत्रूचा वेध घेण्याची प्रचंड क्षमता आहे त्यांच्यात...(call of duty game ची आठवण झाली) दोन्ही तोफांखाली सैनिक आणि दारुगोळा यांसाठी बंकर खोदलेले आहेत...
त्यानंतर निघालो लेण्यांकडे...’वर्ल्ड हेरीटेज’ दर्जा मिळालेलं हे जागतिक ठिकाण! अतिशय उत्तम कोरीवकामाचा हा १ नमुना...त्यावरील कोरलेले मूर्तींचे ते हावभाव अक्षरशः हालवून सोडतात आपल्याला...जितका वेळ तुम्ही त्यांच्याकडे पाहता तितका वेळ ते अधिक दृढ होत जातात, आणि आपल्या मनाला भावतात...
आम्ही प्रत्येक शिल्प काळजीपूर्वक अभ्यास करून पुढे जात होतो....सोबतीला “कुणाल सरपोतदार” यांच्या प्रत्येक शिल्पावरील उत्कृष्ठ स्पष्टीकरणाची जोड... (खरोखरच जबरदस्त माहिती देत होतास यार तू कुणाल..त्यामुळे त्या मूर्ती जणू काही जिवंत होऊन आम्हाला सर्व काही प्रसंग सांगत आहेत अस वाटत होते...hatts of to you..!! truly, तुला खूपच मिस करणार आहेत सगळे जण पुढील ट्रेकपासून..)
त्यातील सगळ्यात जास्त मला शिल्प आवडले ते, शंकर-पार्वती विवाह प्रसंग... that was bit of interesting!
आता भूक लागली होती! (विशेष करून @raj :p) सगळे शिल्प पाहून त्या गोलघुमटात जेवायला बसलो...इडली, (पुदिना चटणी...अर्चना >:o) जवळा, कोथिंबीर-वडी, मशरूम-भाजी, मिरची आणि शेवटी खिचडी..सगळ्यांचे डबे संपले..!! तिकडे मोनिका लपवून लपवून बाटलीत दही घालून तक बनवत होत्या...!! पण आमचा कुणाल ऐकतोय?! बरोब्बर लक्ष गेले त्याचे...(शेवटी ‘ती बाटली’ मोनिका ला पुढे पास करावीच लागली :D)
जेवण झाल्यानंतर उरलेले २-३ शिल्प पाहून निघालो परतीच्या प्रवासाला....पुन्हा तोच समुद्र, पण यावेळी मात्र तो थोडासा भडकलेला वाटत होता...पाणी आत येत होते.....मोनिका तर आधीच जागा बदलून पाणी लागणार नाही अश्या ठिकाणी बसली होती...:D
जवळपास १.१५ तासाच्या प्रवासानंतर पोचलो गेटवे ला...संध्याकाळची थोडी फार मजा-मस्ती करून छायाचित्रे काढून ‘बाजीचा राहिलेला चहा’ पिऊन cst वरून बाकीच्यांना निरोप देऊन पुन्हा आम्ही पनवेल लोकल मध्ये...
एकंदर हा ट्रेक खरोखर उत्तम झाला....कुठेही घाई नाही.....कुठल्याही प्रकारची अज्जिबात गडबड नाही...सगळी ठिकाणे शांतपणे, व्यवस्थित पाहून झाली...
दरम्यान,,,,,’बाज्याचे ते खजुराहो कोरीव काम’, अर्चनाची ती पुदिना चटणी, हावरट दिव्या :p :p.....मोनिकाचा ती पाणी भरण्याची गडबड आणि आरडाओरडा, तेजल-राज ने त्या कुत्र्याच्या पिल्लाला घातलेली अंघोळ, कुणालचा तो शिल्प explain करण्याचा हटके अंदाज, आणि येतानाचे ते मोहिझ-बाजी आणि अर्चना-मोनिका यांची लव-स्टोरी....:D ही ट्रेकची काही ठळक वैशिश्य्ठे....
It was really awsm, satisfactory trek guyzz,,,enjoyed lot….luv u all…….
Rest of u…rhushikesh, sambhaji, tanmay, aniket, rahul, nachiket…..missed u all!

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट