एक चिन्ब भिजलेला ट्रेक - राजमाची
तारीख २८
- २९ जुलै २०१२
वार शनिवार
- रविवार -
सर्वप्रथम दुर्गाविहारचे
मनापासून आभार
आणि चूकभूल
माफ असावी
एवढीच विनंती
----
नचिकेत कुणाल
प्रफुल ( बाजी
) दिव्या या
चौकडीचे आभार
आणि या
सर्वांबरोबर माझी
ओळख करून
देणाऱ्या अर्चनाला
खूप खूप
धन्यवाद!!!
जिभेला जरा बदल म्हणून नेहमीच्या मिसळ पेक्षा खिचडी एवढच बाकी मिसळ काय खाल वा वा !! - ' जेवण वाया घालवल्यास ज्यादा पैसे आकारले जातील ' ( एक पुणेरी पाटी ) - चला उठा आणि चालू पडा - वाट ती राजमाची कडची - सांगितले होते , कि फक्त चालायचे आहे - एक दोन एक दोन बास्स्स्स एवढच ! - चालता चालता समोर आले ते धरण - तुंगार्ली तलाव , थांबलो - सगळ्यांनी आपापले कॅमेरे काढले - आणि या वेळी तर काय ३ कॅमेरे कॅनोन ५५० ड - मी तर गप्पच बसलो - काढला पण ना
ही माझा छोटुसा कॅमेरा - थोडेसे फोटो काढून ओळख परेड -
बरेचसे नवीन अन बरेचसे जुने - मृणालिनी या वेळी पण भेटली - खरच हौशी - मोनिका ची बहिण - दुसरी मनी माऊ - काहीच बोलत नाही - पुन्हा एक दोन एक दोन बास्स्स्स एवढच ! -
ती जागाच
मस्त होती
कारण तिथे
मिळणार होते
पोहे आणि
चहा - काय
आठवतंय न
- ती माझी फरसाणची
पिशवी तिचे
छोटेसे छिद्र
सगळ्यांनी हात
घालून घालून
काय केले
होते रे
देवा - तिथे
सर्वजण वाट
पाहत होते
कपडे बदलायची
- विचार हेच
कि कपडे बदलुन
पुन्हा भिजायचे
कि याच कपड्यात
कुजायाचे - काहींनी
बदलले आणि
काहींनी सुकवले
मी मात्र कोरडाच
होतो नवीन
रेनकोट होता
न माझा - ते
सगळे आटपून
निघालो मंदिर
पाहायला -
एक जूनच मंदिर - असा ऐकलय कि त्या मंदिराचा कळस दिसला एकाला आणि मग ते खोदून काढले आणि मिळाले एक पुरातन हेमाडपंती गोधनेश्वर शिवमंदिर - त्याची बांधणी म्हणजे एकमेकांत खोबणीत अडकवलेले खांब - नंतर तो तलाव आणि परतीचा मार्ग - तेव्हा गडबड कसली , तर दोऱ्या बांधून त्यावर पताके लावायची , त्यात पण घाई ......काय रे देवा ! -काही उंच उंच मित्रांनी ' उंच माझा ........हात ' असल्याचा भावनेने मदत केली हो - संभाजी कुणाल नचिकेत आणि इतर - आलो कपडे बदलून , म्हटल थोडासा आराम - कसला आराम परत भूक - अजून आठवतंय ती मेजवानी - चपाती मटकीची भाजी भात वरण आणि अजून ???? - असं ऐकलय कि सगळ्यांना वाढून होईपर्यंत काहींच जेऊन झाला होत- काही असो पोट भरलं हे महत्वाचे - तिथल्या नामदेव काकांनी तो दिवा आणून दिला रात्रीसाठी - आता ' जिथे मिळे आसरा तिथे हात पाय पसरा 'जेवल्यावर काही वयस्कर मंडळींनी जागा पकडून झोपायच्या प्रयत्न केला खरा पण काही अति उत्साही माणसांमुळे ते वैतागले - कारण सुद्धा तसेच होते - अहो ट्रेक ला आलो आहोत देवदर्शनाला नाही - उठा उठा मेहफिल जमवायची आहे कि नाही ? - चिन्मयने मिळवले टाकीचे झाकण बाकीचे मात्र आपला हात जगन्नाथ .....कशासाठी ??? अहो गाणी गाताना गाण्याला ठेका नको का !!! काय तुम्ही पण न - दोन गट झाले ....एकदम मस्त तयारीत - आम्ही जरा दुबळेच होतो त्या मानाने , पण ठीकेय आता तर भिडायचच !! - एक एक करत अफलातून गाणी बाहेर येत होती - कधी मराठीचा ठेका तर कधी दर्द भरी हिंदी -काही जण भटकंतीला गेले होते रात्रीची सफारी , काय पहिले त्यांनाच माहित - मधेच काय माहित काय झाले - एका वेड्याच्या मामाची तार आली मुंबईहून - आठवतेय का ' मुंबईहून आली मला तार ....... मामा मला ……..' - जाम मजा आली तेव्हा तर , धन्यवाद मित्र मैत्रिणींनो - हि नशा कमी होते न होते तोच विचार केला थोड देवाच नाव घेऊ अन मग टाळ न साठीचे झाकण याच्या गजरात ' हम तो राधे शाम कहेंगे , हम तो सीता राम कहेंगे ' या गजरात सारा गाव जागा केला असेल - म्हणता म्हणता रात्रीचे १२ वाजले आणि आठवले - कुणाल सरपोतदार यांचा जन्मदिवस झाला २६ तारखेला - त्या साठी छोटीशीच प्रेमाची भेटवस्तू अन त्यात २ एकलियरस पण - कदाचित रागावला असेल माझ्यावर , असो …..पण लक्षात तरी ठेवेल त्या निमित्ताने - हे आटोपला आणि सगळे झोपले - या वेळी संदीप सलील नाही आले हो रात्री :-( तन्मय , कुठे होतास रे तू ? - रात्री दिवे बंद झाल्यावर मधेच हा हा हु हु हि हि ----हे काय ते आधी कळलंच नाही - मग समजले कि कोणीतरी चादरीला क्रीम लावत होता , काळोखात तेवढा पण कळत नाही एवढे दामले होते बिच्चारेरेरेरे - आणि सगळे गुडूप
एक जूनच मंदिर - असा ऐकलय कि त्या मंदिराचा कळस दिसला एकाला आणि मग ते खोदून काढले आणि मिळाले एक पुरातन हेमाडपंती गोधनेश्वर शिवमंदिर - त्याची बांधणी म्हणजे एकमेकांत खोबणीत अडकवलेले खांब - नंतर तो तलाव आणि परतीचा मार्ग - तेव्हा गडबड कसली , तर दोऱ्या बांधून त्यावर पताके लावायची , त्यात पण घाई ......काय रे देवा ! -काही उंच उंच मित्रांनी ' उंच माझा ........हात ' असल्याचा भावनेने मदत केली हो - संभाजी कुणाल नचिकेत आणि इतर - आलो कपडे बदलून , म्हटल थोडासा आराम - कसला आराम परत भूक - अजून आठवतंय ती मेजवानी - चपाती मटकीची भाजी भात वरण आणि अजून ???? - असं ऐकलय कि सगळ्यांना वाढून होईपर्यंत काहींच जेऊन झाला होत- काही असो पोट भरलं हे महत्वाचे - तिथल्या नामदेव काकांनी तो दिवा आणून दिला रात्रीसाठी - आता ' जिथे मिळे आसरा तिथे हात पाय पसरा 'जेवल्यावर काही वयस्कर मंडळींनी जागा पकडून झोपायच्या प्रयत्न केला खरा पण काही अति उत्साही माणसांमुळे ते वैतागले - कारण सुद्धा तसेच होते - अहो ट्रेक ला आलो आहोत देवदर्शनाला नाही - उठा उठा मेहफिल जमवायची आहे कि नाही ? - चिन्मयने मिळवले टाकीचे झाकण बाकीचे मात्र आपला हात जगन्नाथ .....कशासाठी ??? अहो गाणी गाताना गाण्याला ठेका नको का !!! काय तुम्ही पण न - दोन गट झाले ....एकदम मस्त तयारीत - आम्ही जरा दुबळेच होतो त्या मानाने , पण ठीकेय आता तर भिडायचच !! - एक एक करत अफलातून गाणी बाहेर येत होती - कधी मराठीचा ठेका तर कधी दर्द भरी हिंदी -काही जण भटकंतीला गेले होते रात्रीची सफारी , काय पहिले त्यांनाच माहित - मधेच काय माहित काय झाले - एका वेड्याच्या मामाची तार आली मुंबईहून - आठवतेय का ' मुंबईहून आली मला तार ....... मामा मला ……..' - जाम मजा आली तेव्हा तर , धन्यवाद मित्र मैत्रिणींनो - हि नशा कमी होते न होते तोच विचार केला थोड देवाच नाव घेऊ अन मग टाळ न साठीचे झाकण याच्या गजरात ' हम तो राधे शाम कहेंगे , हम तो सीता राम कहेंगे ' या गजरात सारा गाव जागा केला असेल - म्हणता म्हणता रात्रीचे १२ वाजले आणि आठवले - कुणाल सरपोतदार यांचा जन्मदिवस झाला २६ तारखेला - त्या साठी छोटीशीच प्रेमाची भेटवस्तू अन त्यात २ एकलियरस पण - कदाचित रागावला असेल माझ्यावर , असो …..पण लक्षात तरी ठेवेल त्या निमित्ताने - हे आटोपला आणि सगळे झोपले - या वेळी संदीप सलील नाही आले हो रात्री :-( तन्मय , कुठे होतास रे तू ? - रात्री दिवे बंद झाल्यावर मधेच हा हा हु हु हि हि ----हे काय ते आधी कळलंच नाही - मग समजले कि कोणीतरी चादरीला क्रीम लावत होता , काळोखात तेवढा पण कळत नाही एवढे दामले होते बिच्चारेरेरेरे - आणि सगळे गुडूप
दुसरी सकाळ
- पहाटेचे ६
- कुणाल सगळ्यांना
उठवत होता-
अरे कुणाल
उठतो रे
! अरे थोडा
वेळ थांब
अजून !! - पण
काय करणार
उठायचं तर
होतच सगळ्यांना
- आणि मग
पुन्हा सगळे
टारझन झाले
- निसर्गाला ओ
द्यायला निघाले
- ओ ओ ऊऊऊओ
- कोण इथे
तर कोण तिथे
तर कोणी त्या
पलीकडे - आटपून
सगळे ठरले
कि एक पिशवी
नि त्यात सगळा
खाऊ - अरे
पण नाश्ता ?
तो
आल्यावरच - झाले
तर मग काहीजण
भिजायच्या तयारीत
एकदम - आधी
निघालो ते
' श्रीवर्धन 'कडे - वाटेत डाव्या
बाजूला पाण्याची
टाकी / राहायच्या
जागा - पुढे
भैरवनाथ मंदिर
- आणि मग
सुरवात त्या
बालेकिल्ल्याची - सगळे
कॅमेरे सरसावले
- काही जण
पुढे तर
काही मागे
- हेमांगीचे पाय
खूप दुखत
होते ,
पण बाजी ,
तो असताना कोणी
कधी काहीच
चुकवू शकत
नाही - वर
गेल्यावर मस्त
काय तो
नजरा होता
-तो मनरंजन ती
ढाक बहिरी
ची रांग, मांजरसुंभा......
- परत चढायला
सुरवात - गडावर
गेल्यावर डाव्या
बाजूने चढलो
होतो ,
म्हणजेच मागची
बाजू - तिथला
तो बुरुज - गुडघाभर
पाणी - त्यात
पण हौस काय
हो - बाजूला खेकडे
असताना पण
त्यातून वाट
काढत गोल
फिरून यायची
मजा काय
ती आम्हालाच माहित
- मोनिका आली
होती का
पाण्यातून ???
घाबरते न
ती - नंतर मुख्य
बुरुजावर पोहोचलो
- तिथून तर
अजूनच मस्त
, काय तो परिसर
होता ,
हिरवागार निसर्ग
, काळा काळा कातळ
, त्यातले धबधबे आणि
सोबतीला आपला
मित्र परिवार
अजून काय
हवे ! - मग
स्वारी निघाली
गड उतरायला - तिथे
उतरताना पुन्हा
दिसली काही
पाण्याची टाकी
/ रहायची जागा
- कोणत्या तरी
पक्षाचे घरटे
अन त्यातली ३
चिमुकली पिल्ले
- काहींनी फोटो
काढले आहेत
मस्त -
अरेरे सांगायचे राहिले ,पावसाने कपडे भिजलेल्या क्षणी ते मक्याचे भाजलेले कणीस , कोणी कोणी खाल्ले हात वर करा ? - अहो खाऊची पिशवी मागेच राहिली , आणली मग कोणीतरी जाऊन - तो पर्यंत एवढी भूक लागली होती कि पुन्हा भैरवनाथकडे आल्यावर वाटले कि जाऊदे मनरंजन…… जाऊन करूया नाश्ता -
अरेरे सांगायचे राहिले ,पावसाने कपडे भिजलेल्या क्षणी ते मक्याचे भाजलेले कणीस , कोणी कोणी खाल्ले हात वर करा ? - अहो खाऊची पिशवी मागेच राहिली , आणली मग कोणीतरी जाऊन - तो पर्यंत एवढी भूक लागली होती कि पुन्हा भैरवनाथकडे आल्यावर वाटले कि जाऊदे मनरंजन…… जाऊन करूया नाश्ता -
पण काहींच्या
आग्रहाखातर केली
सुरवात चढायला
मनरंजन - कोण
कोण ???
– वाटेतच भेटला
तो हनुमान- कोणी
कोणी
पहिला ?- वर गेल्यावरच पाण्याच्या टाकीत दिसलेला तो साप - ती गडबड त्याचे फोटो काढायची - पुढे दिसला तो तलाव , ते छत नसलेला धान्याचे कोठार -त्या अनिमेशला कसे ४ बोटांवर उचलला होता - ते मशरूम पांढरा पांढरा - बाजीने खाल्लं ते - मशरूम ला लहानपणी काय म्हणायचे ???............ आणि का म्हणायचे - तेव्हाच दिसले कि आम्ही मनरंजन वर आणि बाकीचे श्रीवर्धन वर हुशश्श्श्स - चला मनरंजन पण उतरुयात - धावत धावत उतरलो ते थेट विश्रामगृहपाशीच - आणि मग लगेच नाश्ता - पोहे आणि चहा , आहाआआ भूक एवढी कि आधीच २ प्लेट झाले पटापट - तेव्हाच कळले कि जेवायला वांग्याची भाजी , मग काय और २ प्लेट - जवळपास सगळेच ३ -४ प्लेट पोहे न २ चहा नक्कीच - काय बरोबर ना ? - खाऊन मग आटोपून कपडे आणि बैग भरून आराम - मग जेवायला गरम गरम भाकऱ्या नाचणीच्या , ठेचा , वरण भात , भाजी पण मस्तच होती – त्या गावातला छोटसं गब्बू गब्बू कुत्र्याचा पिल्लू-
पहिला ?- वर गेल्यावरच पाण्याच्या टाकीत दिसलेला तो साप - ती गडबड त्याचे फोटो काढायची - पुढे दिसला तो तलाव , ते छत नसलेला धान्याचे कोठार -त्या अनिमेशला कसे ४ बोटांवर उचलला होता - ते मशरूम पांढरा पांढरा - बाजीने खाल्लं ते - मशरूम ला लहानपणी काय म्हणायचे ???............ आणि का म्हणायचे - तेव्हाच दिसले कि आम्ही मनरंजन वर आणि बाकीचे श्रीवर्धन वर हुशश्श्श्स - चला मनरंजन पण उतरुयात - धावत धावत उतरलो ते थेट विश्रामगृहपाशीच - आणि मग लगेच नाश्ता - पोहे आणि चहा , आहाआआ भूक एवढी कि आधीच २ प्लेट झाले पटापट - तेव्हाच कळले कि जेवायला वांग्याची भाजी , मग काय और २ प्लेट - जवळपास सगळेच ३ -४ प्लेट पोहे न २ चहा नक्कीच - काय बरोबर ना ? - खाऊन मग आटोपून कपडे आणि बैग भरून आराम - मग जेवायला गरम गरम भाकऱ्या नाचणीच्या , ठेचा , वरण भात , भाजी पण मस्तच होती – त्या गावातला छोटसं गब्बू गब्बू कुत्र्याचा पिल्लू-
चला आता
उतरायचे - कुठून
तर कर्जत मार्गे
- बापरेरेरेरे - झाली
सुरवात - पुन्हा
एक दोन एक
दोन बास्स्स्स
एवढच ! - पण
या वेळी एक
एक पाऊल जरा
जपूनच - नजर
हटी दुर्घटना
घटी – खरच
, हसताय काय ?
- उतरताना प्राजक्ता
होती सोबत
, घाबरत घाबरत - धडपडी
अर्चना आणि
या वेळी हृषीकेश
पण- ते मधले
धबधबे पार
करताना केलेला
तो ब्रिज म्हणजे
अफलातून अनुभव
- धन्यवाद कुणाल
बाजी नचिकेत
संभाजी हृषीकेश
अनिमेश लौकिक
राजूमामा ओमकार
निखील मोहित
आणि अनिकेत
- पावसाचे नितळ
पाणी रौद्र
रूप कसे
धरते याचा
पण भयानक अनुभव
काहींनी घेतला
- उल्हास नदीचे
पात्रं तर
खूपच छान
- मग ती कोंढाणे
लेणी ,
२०००-२५००
वर्ष जुनी
- १०० फुटांवरून
कोसळणारा धबधबा
- अप्रतिम ! या
एकाच शब्दात
वर्णन - मधेच
धावता धावता
पडणारे काही
ट्रेकर्स - वाटत
होते कि
पाय हातात
घ्यावे - ' बसलो कि
उठणार नाही
आणि उठलो
कि बसणार नाही
' अशी गात साऱ्यांची
- वाढणारा काळोख
- घरी जायची
ओढ -
मग एका
ठिकाणी म्हणजेच
कोंदिवडे गावात
चहा - ती
घमेल्यातली शेकोटी
- मागे ठेवलेले
अंड्याचे ओम्लेट
, काय रे संभाजी
हृषीकेश - मग
३ टम टम
- आणि पोचलो
कर्जतला ३०
मिनिटात - रात्री
९.३० ची
गाडी पकडून
मुंबईला रवाना
-सगळे आपापल्या
स्थानकावर उतरले
- मी मात्र कांजुरमार्ग
ला उतरून मग
रिक्षाने मालाड
–
आणि असे
सर्व सुखरूप
पोहोचले आपापल्या
घरी -----खूप
आभार ------अशाच
अजून बऱ्याच
क्षणांची वाट
पाहतोय हो
आम्ही कुणाल
सरपोतदार आणि
मित्र परिवार
------

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा